Posts

 ना धो महानोर ,निसर्ग अन सौंदर्य श्रीधर तिळवे नाईक  केशवसुतांनी सौन्दर्यवाद सुरु केला असं म्हंटल जातं प्रत्यक्षात त्यांनी फुल्यांचा सुधारणावाद अन युरोपियन सौन्दर्यवाद ह्यांचा मिलाफ केला त्यांनी वेदांताशी हितगुज केले मराठी कवितेत पुरोगामी व्यक्तिवाद रुजवला पण ते कधीही निसर्गाशी एक होऊ शकले नाहीत मात्र महात्मा फुल्यांच्या कविता ग्रामीण कवितेचा आरंभबिंदू असला तरी सौन्दर्यवादात केशवसुतांची एक खेडे ही कविता आरंभ मानली जाते केशवसुत ह्यांना निसर्गाशी एक होता आले नाही तरी बालकवींना ही किमया औदूंबर कवितेत साधली मग माधव ज्युलियन वैग्रे आले त्यापूर्वी चंद्रशेखरांचे काय हो चमत्कार हे खंड्काव्याही महत्वाचे !  हा मार्गी मराठी सौन्दर्यवाद बहरला तो आरती प्रभू व ग्रेस ह्यांच्यात !  ह्या मार्गी सौन्दर्यवादाला छेद देणारी  देशी मराठी सौन्दर्यवादाची परंपरा आपल्याकडे सुरु केली ती पु शि रेगे सुगी लिहणारे ग ल ठोकळ व बा भ बोरकर ह्यांनी ! मात्र ह्यांच्यात एक तत्व मिसिंग होते ते म्हणजे कृषितत्व ! ह्यांच्यापैकी कोणीही शेतात न्हवता (ठोकळ काही प्रमाणात अपवाद असावेत ) त्यामुळं ज्यांनी शेतीची कामं केलंत त्यांना ह्या

पुस्तक परीक्षणे

पुस्तक  परीक्षणे  वाचाल तर वाचाल  श्रीधर तिळवे नाईक  गेली काही वर्षे मी मांडत असलेल्या चौथ्या नवतेला धरून अनेक कादंबऱ्या येतायत त्यातील दोन कादंबऱ्या मी वाचल्या पहिली नव्वदोत्तर सुधीर देवरे ह्यांची "मी गोष्टीत मावत नाही " ही आहे अहिराणी भाषेच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध असलेल्या देवरेंनी इथे आत्मपरीक्षणाच्या परखड मायक्रोस्कोपखाली स्वतःला ठेवून आसपासचा माहोल  चित्रित केला आहे  वास्तव चित्रण आणि चिकित्सा ह्या दोन्ही गोष्टी इथे सतत  एकत्र चाललेल्या दिसतात मूल्यव्यवस्था कोसळताना होणारा त्रागा आणि तरीही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणारा नायक इथे सतत प्रयत्नशील राहतो (प्रकाशक: पद्मगंधा प्रकाशन पुणे ) दुसरी कादंबरी प्रणव सखदेवची चतुर ! त्याला युवा साहित्य अकादमी मिळाल्याने तो आता काय नवे काय लिहिणार असा प्रश्न होता पण त्याने तो सोडवला आहे. .चौथ्या नवतेच्या कादंबरीची सर्व वैशिष्ट्ये ह्या कादंबरीत आढळतात फिक्शन आणि रियॅलिटीचे पुसलेले अंतर डिजिटॅलिक वृत्तांताचे समपर्क वापरण , खुद्द लेखकच नायक असणे आणि तो खरा आहे कि फिक्शन आहे हे शेवटपर्यंत न कळणे अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही कादंबरी गजबजलेली आहे प्रण